नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीदरम्यान ईव्हीएम बद्दलच्या तक्रारी समोर येत होत्या त्याविरोधात २१ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात पन्नास टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती परंतु ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून एकाच याचिकेवर किती वेळा सुनावणी घ्यायची, अशा शब्दात याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.
दरम्यान, व्हीव्हीपॅटच्या पन्नास टक्के मोजणीसंदर्भात सुमारे २१ पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. या निर्णयबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत हॊते
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अत्यंत दुर्देवी असून व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी व्हावी, यासाठी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी तसेच जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.