बहुजननामा ऑनलाइन टीम – पाटणा: बिहार निवडणुकीची(Bihar Elections) मतमोजणी सुरू असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी बढत घेतली. यामुळे निवडणुकीचे संपूर्ण वातावरण बदलून गेले आहे.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लोकप्रियता कमी झाल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकीत(Bihar Elections) एनडीएला विजय मिळाल्यास त्याचे श्रेयपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना जाईल. पराभव झाला तर त्याचे खापर नितीशकुमारांच्या डोक्यावर फुटेल. कारण, भाजपशासित राज्यांतील विधानसभा निवडणुकांत तेथील मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज जनतेने शिवराजसिंह चौहान, रमणसिंह यांना सत्तेवरून दूर केले होते. भाजप प्रभावाचे खापर माथी मारून घेणार नसल्याची चर्चा आहे
सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटीजच्या पाहणीनुसार, २०१५ निवडणुकांनंतर नितीशकुमार यांच्याबद्दल ८० टक्के लोकांचे अनुकूल मत होते. आता हे प्रमाण ५२ टक्क्यांपर्यंत कमी झाले. नितीशकुमारांच्या राजवटीत २०१९-२० या आर्थिक वर्षात बिहारच्या ठोकळ उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम समाजकल्याण योजनांवर खर्च करण्यात येत होती. त्याचे लाभ मिळत असूनही जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांकडे आकर्षित झाल्याचे दिसून आले.