पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मंगळवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोरेगाव-भीमा अत्याचाराची कल्पना होती. तसेच दंगलीमध्ये त्यांचा पण हात होता, असे वामन मेश्राम म्हणाले.
तसेच चौकीशीसाठी नेमलेल्या आयोगासमोर फडणवीस यांना बोलावून त्यांची चौकशी करावी, अशी मागणीही मेश्राम यांनी केली आहे. झालेल्या दंगलीला राज्य शासन जबाबदार असून दंगलीमागे मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचाही हात आहे. त्याचे पुरावे भारत मुक्ती मोर्चाकडे असून ते पुरावे उच्च न्यायालय आणि चौकशी आयोगासमोर ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मिलिंद एकबोटे आणि मनोजर भिडे यांना क्लीन चिट दिल्याचेही स्पष्ट केले होते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान त्यांनी २९ जानेवारी रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी बंदचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यावेळचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे हेही आंदोलकांच्या बाजूने होते म्हणून त्यांची गच्छंती झाली. ते दोघेही कोरेगाव-भीमा दंगलीचे बळी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com