नवी दिल्ली : बहुजननामाऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाने आयोध्याच्या वादग्रस्त जागेवर राम मंदिर निर्मितीबाबतचे प्रकरण आता मध्यस्थांकडे सोपण्यात आले आहे. या मध्यस्थीसाठी ३ सदस्यीय समिती नेमली आहे.या समितीमध्ये न्या.एफ एम खलिफुल्ला. श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी श्री श्री रविशंकर यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे.
ओवैसी यांनी म्हणले कि सुप्रीम कोर्टाने श्री श्री रविशंकर यांना मध्यस्थ बनवले आहे. परंतु त्यांचे वादग्रस्त वक्तव्य विसरता कामा नये हे सर्वांसमोर आले आहे.ओवैसी यांनी रविशंकरचे वाक्यला अधोरेखत केले आहे.’जर मुसलमानांनी अयोध्यावरून आपला हक्क सोडला नाहीतर भारत सीरिया बनेल’, सुप्रीम कोर्टाने तटस्थ व्यक्तीला मध्यस्थ बनवले असते तर चांगले झाले असते. श्री श्री रविशंकर यांना मध्यस्थ बनवलेच आहेच तर आता त्यांना तटस्थ राहावे लागणार आहे. श्री श्री आपली जबाबदारी समजतील. असे ओवैसी म्हंटले आहे .