नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – हिंदूत्ववादी गटांकडून २० कोटी भारतीय मुस्लिमांना दुय्यम वागणूक मिळते.तसेच भारतभर काश्मीरी नागरिकांचा छळ जात आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर राज्यात असहिष्णुता पसरवली जात आहे. या विरोधात कार्य करण्यासाठी मी राजीनामा देत आहे, असे फैजल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले होते.
शहा फैजल यांनी २००९ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकवला होता. १० वर्षानंतर आयएस पदाचा राजीनामा देऊन फैजल यांनी ‘जम्मू कश्मीर सिटीजन पार्टी’ या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली वागणूक याच्या निषेधार्थ राजीनामा देत असल्याचे ३५ वर्षीय फैजल यांनी सांगितले होते.
भारत-पाक तणाव चालू असताना पाकिस्तानी संसंदेमध्ये इम्नान खान यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा.असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे .मात्र आता भारतातून देखील खान यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा अशी शाह फैजलने भूमिका घेतली आहे.