औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन- राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असून सर्वात जास्त मिळूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागणार का ? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान निवडणुकीच्या वेळी भाजपने नको त्या आमदारांना संधी दिली. तसेच भाजपने ज्या पद्धतीने प्रचार केला, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आपला अहंकार नडला असल्याचे वक्तव्य जेष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम देसरडा यांनी केले आहे.
तसेच राज्यातील अश्या परिस्थितही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला हवे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.राज्यात शेतकऱ्यांची परस्थिती चिंताजनक आहे, संपूर्ण महाराष्ट्रात हीच स्थिती आहे. परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु स्थापन होणाऱ्या सरकारच्या केंद्रस्थानी शरद पवार असल्याने त्यांच्याकडून शेतीबद्दल मोठ्या अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबबत एक पत्रदेखील राज्यपालांना दिले आहे. १३ कोटी लोकांपैकी ११ कोटी लोकांचे हाल होत आहे.
मावळत्या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पर हेक्टर मदत घोषित केले होते. त्याचे काय झाले असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.तसेच या मुद्यावर लवकर निर्णय घेण्यात यावा यासाठी देसरडा राज्यपालांची भेट घेणार आहेत.ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने कोणाकडे मदत मागावी, असा संभ्रम आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण आणि निर्मूलन मंडळाने राज्यपालांना भेटीसाठी वेळ मागितल्याचेही देसरडा यांनी संगीतले.
Visit : bahujannama.com