मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढा वाढत गेल्याने शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. मुख्यमंत्री पदासाठी अडून बसणाऱ्या शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. मात्र याचे पडसाद मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमटू लागले आहेत. भाजप पक्षानं मुंबई महानारपालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्यानं स्पष्ट केलं आहे. उमेदवार निवडून आण्यासाठी अपेक्षित संख्याबळ नसल्यानं भाजपने सांगितले आहे. मात्र २०२२मध्ये मुंबई महानगरपालिकेचा भाजपचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावर आणू असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत…मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही… मात्र 2022 चा मुंबईचा महापौर स्वबळावर.. आणि संख्याबळावरही! @Dev_Fadnavis @ChDadaPatil @MPLodha @manoj_kotak @BJP4Maharashtra @bjp4mumbai
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 18, 2019
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेकडे ९३ तर भाजपकडे ८३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्र्य लढल्या होत्या. मात्र राज्यात सत्ता स्थापनेच्या कोंडीमुळे भाजपने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत, मात्र संख्याबळ नाही. विरोधी विचारांच्या जीवावर आता अभद्र करणार नाही मात्र २०२२ चा मुंबईचा महापौर स्वबळावर आणि संख्याबळावरही ! असं विधान करत शेलार यांनी शिवसेनेला खडसावले आहे.
दरम्यान, भाजपा नेते आणि खासदार मनोज कोटक यांनी सांगितले कि, मुंबई महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वासही कोटक यांनी व्यक्त केला.
Visit : bahujannama.com