नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या खाती उघडण्याचा पर्याय देते. एसबीआयमध्ये तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) आणि रिकर्निंग डिपॉझिट (आरडी) च्या माध्यमातून देखील बचत करू शकता. नुकतीच एसबीआयने बचत खात्यांत १ लाख रुपयां पेक्षा कमी रक्कम ठेवीवर व्याज दर कमी करून ३.२५ टक्के केले आहे. एसबीआयचा हा नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाला आहे.
एसबीआय ग्राहकांना त्यांच्या खात्यात दरमहा किमान रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. एसबीआय खात्यात किमान रक्कम ठेवण्या संबंधित हा नियम प्रत्येक शहरात वेगळा आहे.
– जर तुमचे खाते मेट्रो सिटीमध्ये असेल तर तुम्ही तुमच्या एसबीआय खात्यात दरमहा किमान ३,००० रुपये ठेवणे आवश्यक आहे.
– त्याचवेळी अर्ध-शहरी भागातील सरासरी किमान शिल्लक २ हजार रुपये असावे. ग्रामीण भागात एसबीआय खात्यांसाठी ही मर्यादा १००० रुपये आहे.
– तसेच महत्वाचे म्हणजे आपण जर आपल्या एसबीआय खात्यात सरासरी किमान शिल्लक ठेवली नसेल तर यासाठी आपल्याला १० ते १५ रुपये आणि जीएसटी शुल्क भरावे लागेल. हा शुल्क मेट्रो सिटी आणि इतर शहरी भागातील शाखांसाठी आहे.
– त्याचबरोबर अर्ध-शहरीसाठी दंड ७.५ ते १२ रुपये आणि जीएसटी आहे.
– ग्रामीण भागाच्या एसबीआय खात्यात किमान रक्कम नसल्यास त्यावर ५ ते १० रुपयांचा दंड आणि जीएसटी देय आहे.
दरम्यान ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत एसबीआयचा निव्वळ नफा तीन पट जास्त होता. जास्त व्याजदराच्या उत्पन्नासह इतर कमाईमुळे हे शक्य झाले आहे. बँकेचा एकूण नफा ३०११.७३ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात ती ९४४.८७ कोटी रुपये होती.
Visit : bahujannama.com