बहुजननामा ऑनलाईन टीम : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून राज्यसभेचे २५० वे सत्र आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी केलेल्या भाषणाने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “सभागृहात अडथळे निर्माण करण्यापेक्षा आपण संवादाचा मार्ग निवडला पाहिजे, राष्ट्रवादी-बीजेडीकडून सर्व पक्षांनी नियम पाळायला शिकायला हवे, एवढेच काय भाजपने देखील हे नियम शिकणे गरजेचे आहे, जेव्हा आपण विरोधात होतो त्यावेळी देखील या सरकारने कामे केली आहेत. ‘ यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते.
PM Modi in Rajya Sabha: Today I want to appreciate two parties, NCP and BJD. These parties have strictly adhered to parliamentary norms. They have never gone into the well. Yet, they have raised their points very effectively. Other parties including mine can learn from them. pic.twitter.com/TXvUUOWJin
— ANI (@ANI) November 18, 2019
राज्यसभेचे २५० सत्र :
पंतप्रधान म्हणाले, २५० सत्रावेळी याठिकाणी अनेक गोष्टीवे विचारमंथन झाले आहे, जर लोकसभा सर्वसामान्यांशी जोडले आहे, तर राज्यसभा हे दूरदृष्टी असलेले सदन आहे. विविधता आणि स्थिरता हे या सदनाचे वैशिट्य आहे अनेक दिगज्ज या सदनात होते. या सदनाने इतिहास घडविला आहे.
‘बाबासाहेब आंबेडकरांची याच सदनातून सुविधा :
पंतप्रधान म्हणाले, राज्यसभा कधीही भंग झाली नाही आणि होणारही नाही, येथे राज्यांचे प्रतिनिधित्व दिसून येते. प्रत्येकाला निवडणूक क्षेत्र पार करणे सोपे नाही, परंतु त्यांची राष्ट्रीय हितसंबंधातील उपयुक्तता कमी होत नाही. देशाने पाहिले आहे की शास्त्रज्ञ, कला, लेखक यांच्यासह अनेक मान्यवर येथे आले आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, काही कारणास्तव त्यांना लोकसभेत पोहोचू दिले नाही परंतु ते राज्यसभेत आले.
PM Modi: In 2003, Atal ji had remarked that Rajya Sabha may be the second house but it should not be called a secondary house. Today, I agree with the thoughts of Atal ji and add that the Rajya Sabha must be an active supportive house for national development pic.twitter.com/dO4mS482qi
— ANI (@ANI) November 18, 2019
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते की, केवळ आपले विचार, वागणूक आणि विचार आपल्या संसदीय व्यवस्थेचे औचित्य सिद्ध करतील. संविधानाचा भाग बनविलेल्या या सभागृहाची परीक्षा आपल्या कामाद्वारे होईल, आपण आपल्या विचारांनी देशाचे औचित्य साधू शकू, असा आपला प्रयत्न असावा.
गेल्या पाच वर्षांत विलक्षण काम :
पीएम मोदी म्हणाले की, या सदनात गेल्या ५ वर्षांवर नजर टाकल्यास या सभागृहाने तिहेरी तलक कायदा, सर्वसाधारण वर्गाच्या गरीब कुटुंबाला आरक्षण, जीएसटी, कलम ३७०, जम्मू काश्मीर असे अनेक नियम निकाली काढले आहे.आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की राज्यांचे कल्याण करणे हे आपले काम आहे, देशाच्या विकासासाठी फेडरल स्ट्रक्चर हा सर्वात महत्वाचा शब्द आहे. केंद्र सरकार ज्या धोरणांची पूर्तता करते राज्य सरकार कशी तयार करते, हे या सदनातून ठरवले जाते.
Visit : bahujannama.com