नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आता अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) नेते वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर कारवाई केली आहे. त्या वक्तव्यानंतर पक्षात उडालेल्या गोंधळामुळे असदुद्दीन ओवेसी वारिस पठाण यांना माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली. जोपर्यंत पक्षाने परवानगी दिली नाही तोपर्यंत वारिस पठाण जाहीर निवेदन देऊ शकणार नाहीत.
वारिस पठाण यांनी कर्नाटकच्या गुलबर्गा येथे जाहीर सभेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले होते की, ‘१०० कोटी लोकांवर आम्ही १५ कोटी भारी आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यानंतर त्यांच्यावर टीका झाली, असदुद्दीन ओवैसी यांनीही या विधानाचा निषेध केला. वारिस पठाण हे एआयएमआयएमचे प्रवक्ते आहेत आणि हिंदी पट्ट्यातील पक्षाचा एक प्रसिद्ध चेहरा आहेत. मेळाव्यात, वारिस पठाण म्हणाले, ‘हमने ईंट का जवाब पत्थर से देना सीख लिया है. मगर हमको इकट्ठा होकर चलना पड़ेगा. आजादी लेनी पड़ेगी और जो चीज मांगने से नहीं मिलती है, उसको छीन लिया जाता है.’
Vaniyambadi, Tamil Nadu says NO to #CAA_NRC_NPR. pic.twitter.com/xFfAk0gxKx
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 19, 2020
वारिस यांच्या विधानावरून राजकीय गदारोळ
वारिस पठाण यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी कोणत्याही धर्माचे नाव घेतले नाही किंवा कोणाविरूद्ध काही बोललो देखील नाही. या विधानाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. वारिस पठाण यांच्या विधानावर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त केली. तेजस्वी म्हणाले की, त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे. तेजस्वी यांनीदेखील भाजपवर निशाणा साधतांना सांगितले की एआयएमआयएम हे भाजपाच्या बी संघासारखे काम करत आहे. विशेष म्हणजे वारिस पठाण व्यतिरिक्त एआयएमआयएमशी संबंधित आणखी एक वादविवाद समोर आला होता. असदुद्दीन ओवैसी यांच्या बैठकीत या महिलेने पाकिस्तानच्या जयजयकाराची घोषणाबाजी केली. ज्यानंतर महिलेला अटक करण्यात आली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी हे वक्तव्य खोटे सांगितले आहे आणि कारवाईची मागणी केली आहे.