मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील सत्ता स्थापनेसाठी चालू असलेले महानाट्य सर्वानी बघितले त्यानंतर अखेर शिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत सरकार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु काही शिवसैनिक महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यामुळे नाराज झालेत आणि चक्क धारावी येथील ४०० शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला आहे. भ्रष्ट आणि विरोधी पक्षासोबत शिवसेनेने हातमिळवणी केल्याने हे कार्यकर्ते नाराज होते.
शिवसैनिक रमेश नाडार यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सांगितले की, हिंदू पक्षाविरोधात शिवसेनेने हातमिळवणी केल्याने आम्हाला स्वत:ला फसवणुकीची भावना निर्माण झाली. शिवसेना भ्रष्टाचारी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले. फक्त सत्तेसाठी शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा-शिवसेना युती झालेली असली तरीही मतदारसंघ सोडण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नव्हते. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवाराचा तर भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास नकार दिला होता.
रमेश नाडार नाराजी व्यक्त करत म्हणाले की, निवडणुकीच्या काळात आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागितली. पण आता त्यांना कोणतं तोंडाने सामोरे जाणार? आम्ही प्रामाणिकपणे लोकांकडे मतं मागितली होती. मी शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा अंतरात्मा आणि वाचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझे मत जाणून घ्यायचे होते. आता मला माझी भूमिका मांडायची आहे. जो माझ्या श्रीरामाचा नाही , तो माझ्या काही कामाचा नाही आहे असा आरोप सोळंकी यांनी केला.
Visit : bahujannama.com