नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – लोकशाही समाजवादी शीलाचे नागरिक निर्माण करणे हेच अरूणच्या ‘आनंदनिकेतनचे’ आणि आमचेही ध्येय होते. आम्ही सर्व एकाच वाटेचे वाटसरू आहोत. परंतु अरूणने त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे ब्रीद कायम जपले आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी केले.
आनंदनिकेतन प्रयोगशील मराठी शाळेचे संस्थापक अरूण ठाकूर यांची स्मरणसभा परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडली. या सभेमध्ये बाबा आढाव बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट. विनायकदादा पाटील.शांताराम चव्हाण.ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा.निशा शिऊरकर.मंगल खिंवसरा. वासंती दिघे. कॉ. श्रीधर देशपांडे. नाना कुलकर्णी. अर्जुन कोकाटे. विनोदिनी काळगी यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
बाबा आढाव बोलताना म्हणाले माणसाने माणसासारखे वागणे हेच अरूणचे ध्येय होते.अरूण खूप मोठा माणूस होता. परंतु या माणसांचा मोठेपणा टोचत नाही. माझा फार मोठा सहकारी गेल्याचे दु:ख व्यक्त केलं. आणि यावेळी बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांची ‘सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर’ ही प्रार्थना उपस्थितांकडून म्हणवून घेतली.
या सभेमध्ये अनिल अवचट बोलताना म्हणाले. अरूण एक महाकोष होता. माहितीचा खजिना त्याच्याकडे असायचा.त्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असायचे नाना कुलकर्णी म्हणाले. अरूणबद्दल एक प्रेम. जिव्हाळा.आत्मियता.ओढ कायम राहिली.समाजातल्या कथा.व्यथा त्याने नेहमी सांगितल्या. स्वत:चे दु:ख नेहमी लपवून ठेवले. त्याने लिहिलेले ‘नरकयातना’ पुस्तक त्याचे स्मारक आहे.