शांतीनिकेतन ( पश्चिम बंगाल ) : बुजनननामा ऑनलाईन – देशात गेल्या पाच वर्षाच्या काळात प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सेवांकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. अशा शब्दात नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारवर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत समाधानकारक निकाल लागतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की आयुष्यमान भारत आणि राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजनां या देशातील प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या योजना नाहीत. केवळ राजकीय लाभ मिळवण्याच्या उद्देशाने या योजना सुरू करण्यात केल्या आहेत. त्यामागचे सरकारचा संकुचित विचार दिसून येतो.
शिक्षण आणि प्राथमिक आरोग्यासाठी देण्यात आलेला निधीही पुरेसा नाही. प्राथमिक आरोग्याकडे पुर्णपणे दुर्लक्षच या काळात झाले आहे. असे ते म्हणाले. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती अत्यंत भीषण असल्याने गरीब लोकांना आरोग्य सेवां परवडत नसता नाही खासगी रूग्णालयांकडे जावे लागते. आगामी काळात लोकसभेचे निकाल समाधानकारक लागतील आणि या सेवांमध्ये त्यानंतर चांगली सुधारणा होईल असे ते म्हणाले.
मी लोकशाहींवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. आणि भविष्यात देश नक्कीच चांगली प्रगती करेल. असेही त्यांनी यावेळी नमूद केले. भारतापेक्षा चीनची आर्थिक प्रगती उत्तम आहे. असे नमूद करताना ते म्हणाले की चीनने लोकशाही मार्गाने देश कसा चालवावा हे भारताकडून शिकावे पण अल्पावधीत चांगली आर्थिक प्रगती कशी करावी हे आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे.