नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन ( सिटू ) या कामगार संघटनेने विविध मागण्यासाठी तसेच व्यवस्थापनाकडून स्थानिक युवकांना कामावर घेण्याच्या विषयावर निर्णय होत नसल्याचा निषेधार्थ जिंदाल कंपनीवर हा मोर्चा काढण्यात आला होता.
या निषेध मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते. मुंढेगाव येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली होती. कंपनीने येथील गावकऱ्यांना योग्य ते न्याय दिला नाही व दिलेलं अश्वाशन पळल नाही. त्यामुळे आम्ही कंपनीच्या विरोधात निषेध मोर्चचे आयोजण केले आहे. असे जिल्हा नेते देवीदास आडोळे म्हणले.
या आहेत प्रमुख मागण्या
१) स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य, २) कंपनी आवारातील व्यवसाय बंद करावे, ३) कंपनी प्रवेशद्वारावरील व्यावसायिक टपरीधारकांना पाणी, वीज कनेक्शन द्यावे, ४) किमान वेतन देऊन कामगारांना कायम करावे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांशी यावेळी झालेल्या चर्चेत मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात
येईल. यावेळी जिल्हा नेते देवीदास आडोळे, जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, कांतिलाल गरुड आदींनी मोर्चात सहभाग घेतला.