बहुजननामा ऑनलाइन – केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत(pm kisan samman nidhi) प्रत्येक वर्षी शेतकर्यांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम तीन हप्त्यात शेतकर्यांच्या खात्यात पाठवली जाते. आतापर्यंत योजनेंतर्गत(pm kisan samman nidhi) शेतकर्यांच्या खात्यात 6 हप्ते पाठवले गेले आहेत. आता केंद्र सरकार सातवा हप्ता जारी करणार आहे. जर तुम्हाला अजूनही पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर काही आवश्यक कामे तात्काळ पूर्ण केली पाहिजेत.
तीन राज्यात 31 मार्च 2021 पर्यंत आहे सूट
या योजनेचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम आपले आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक करावे लागेल. मात्र, जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयच्या शेतकर्यांना पीएम-किसान स्कीमचे पैसे घेण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. म्हणजेच या राज्यातील लोक बँक अकाऊंट पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत आधारशी लिंक करू शकतात.
जम्मू-काश्मीर, आसाम आणि मेघालयचे शेतकरीसुद्धा 31 मार्चपर्यंत आधारला बँक खात्याशी लिंक करू शकतात. यानंतर शेतकर्यांना सूट मिळणार नाही. अन्य राज्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 डिसेंबर 2019 पासूनच आधारला बँक खात्याशी लिंक करणे अनिवार्य असेल. खर्या शेतकर्यालाच योजनेचा लाभ मिळावा, असा सरकारचा प्रयत्न आहे.
बँक खाते असे करा आधारशी लिंक
बँक खाते आधारशी लिंक करणे सोपे आहे. यासाठी आधार कार्डची फोटो कॉपी घेऊन तुमच्या बँकेत जा. या कॉपीवर हस्ताक्षर करा. यानंतर तुमचे बँक अकाऊंट आधारशी लिंक केले जाईल. हे काम ऑनलाइन सुद्धा होऊ शकते. आधार आणि बँक खाते लिंक झाल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर मॅसेज येईल.