बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रातील राजकारणात सतत नवे वळण घेत आहे. अजितदादांना राष्ट्रवादीविरुद्ध बंड करत भाजपला पाठिंबा दिला, त्यानंतर अजित पवारांकडून भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी अजितदादांना भेटून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण अजितदादांना पटवून देण्यात राष्ट्रवादीचे नेते अपयशी ठरले. बैठक झाल्यानंतर छगन भुजबळ बाहेर आले तेव्हा अजित पवार हेदेखील थेट विधानसभेतून आपल्या घरासाठी निघून गेले.
Chief Minister's Office, Maharashtra: CM Devendra Fadnavis’ first signature of this tenure was done on a CM Relief Fund cheque, on reaching Mantralaya, which was handed over to Kusum Vengurlekar by the Chief Minister. pic.twitter.com/e9klSBasiN
— ANI (@ANI) November 25, 2019
सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजितदादांची समजूत काढण्यासाठी पोहोचले असता त्यांना वारंवार परत येण्यास सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार जर फ्लोअर टेस्ट झाली तर त्यांचा पराभव होईल, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजितदादांना सांगण्यात आले होते. तसेच अजित पवारांनी परत यावं अशी शरद पवारांची इच्छा आहे, जेणेकरून पवार परिवारावर कोणताही परिणाम होणार, असं देखील या नेत्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही चर्चा केली आहे, सकारात्मक पद्धतीने काही मार्ग शोधण्याचे प्रयत्न करीत आहोत. अजितदादांना पक्षातून बाहेर काढले जाईल का, असे जेव्हा छगन भुजबळ यांना विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले की, हे प्रकरण आपण शरद पवारांपर्यंत पोहोचवू. मात्र, पुन्हा एकदा अजितदादांना भेटू असे जयंत पाटील म्हणाले.
आधी छगन भुजबळ हे अजितदादांना भेटण्यासाठी गेले, त्यानंतर जयंत पाटील, वळसे पाटील यांच्यासह इतर नेते देखील अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी पोहोचले. शरद पवार अजितदादांशी अद्याप बोलले नाहीत. मात्र ट्विटरवरून दोन्ही नेत्यांकडून सतत निवेदने दिली जात होती. राष्ट्रवादीचे म्हणणे आहे की, अजितदादांसोबत असल्याचा दावा करणारे ५४आमदारांपैकी ५३ आमदारही परत आले आहेत. यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राजभवनात जाऊन सुमारे १६२आमदारांना पाठिंबा देणारे पत्र दिले. फ्लोर टेस्ट नंतर राष्ट्रपती राजवट पुन्हा येऊ नये, म्हणूनच त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Visit : bahujannama.com