बहुजननामा ऑनलाईन टीम – शनिवारी अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे शपथविधीविरोधात महाविकासआघाडीने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत सुनावणी पूर्ण झाली असून मंगळवारी कोर्ट आदेश देणार आहे. भाजप जर विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करू शकलं नाही तर भाजप राज्यपालांकडे विधानसभा बरखास्त करण्याची मागणी करू शकते. अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल आपल्या विवेकबुद्धीवर आणि नैतिकतेचा आधार घेऊन निर्णय घेत असतात. त्यामुळे महाविकासआघाडीला संधी द्यायची की विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय द्यायचा हे संपूर्णपणे राज्यपाल कोश्यारींच्या निर्णयावर अवलंबून आहे. तो अधिकार राज्यपालांना असतो.
भाजप विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध करु शकले नाही तर विधानसभा बरखास्त करणार असल्याची मागणी सुत्राकडून मिळत आहे. त्यामुळे भगतसिंग कोश्यारींनी विधानसभा बरखास्त केली तर पुन्हा एकदा राज्यात विधानसभेसाठी निवडणूक लागू शकते. असे झाल्यास आमदारांना मोठा धक्काच बसेल. कारण पुन्हा एकदा राज्यात बहुमताचा आकडा गाठणे दूरच निवडूण येणे सुद्धा मुश्किल होण्याचे चिन्ह सध्या दिसत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, पुन्हा निवडणूक होणं सध्याच्या परिस्थित शक्य नाही. फडणवीस हे बहुमत सिद्ध करु शकले नाही तर महाविकासआघाडीला संधी मिळू शकते. या प्रकरणी आज सुप्रिम कोर्टाने निर्णय राखून ठेवला असून मंगळवारी आदेश देणार आहे. त्यामुळे कोर्ट काय आदेश देणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Visit : bahujannama.com