अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – सध्या एका बॅनरची खूपच चर्चा होताना दिसत आहे. अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर लावण्यात आलेल्या या बॅनरवर लिहिलं आहे की, देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राज देवेंद्र. या बॅनरवरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांनी असंही ठणकावून सांगितलं आहे की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं कार्यकर्त्यांना आवर घालावा. छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे एकमेव राजे आहेत.’ सध्या बॅनरची खूपच चर्चा होताना दिसत आहे.
मार्गावर लावण्यात आलेले हे बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महजनादेश यात्रेसाठी शुभेच्छा देण्यासाठी होते. अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर हे बॅनर लावण्यात आले आहेत ज्यावर लिहिलं आहे की, “देवांचा राजा इंद्र महाराष्ट्राचा राज देवेंद्र.” बॅनरवरील याच मजकुरामुळे लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
जय शिवराय मित्रानो
आमच्या #अहमदनगर मध्ये औरंगाबाद रोड वर
देवांचा राजा इंद्र
महाराष्ट्र चा राजा देवेंद्र
असा मजकूर असलेला बोर्ड आहे
तरी @CMOMaharashtra साहेब आणि @BJP4Maharashtra आपल्या कार्यकर्त्यांना आवर घालावा
महाराष्ट्राचा राजा एकच
छत्रपती शिवाजी महाराज @NagarPolice pic.twitter.com/olaiFrjoDu— Hemantrao mulay. (@hemantraomulay) August 18, 2019
हेमंतराव मुळे यांनी या बॅनरचा फोटो पोस्ट करत ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री साहेब आणि भाजपा कार्यकर्त्यांना आवर घालावा. छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे राजे आहेत.” असं मुळे यांनी ठणकावून सांगितलं आहे. काहींनी असंही म्हटलं आहे की बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांनाही धडा शिकवायला हवा. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत आपल्या भावना मांडल्या आहेत.