यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – उन्हाळा सुरु झाला कि शाळेतील मुलांना सुट्टीचे वेद लागू लागतात अवघ्या दीड महिन्यानंतर शैक्षणिक सत्र संपणार आहे. मात्र, उन्हाळी सुटीतही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दररोज पुरविण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. राज्यातील ४० हजार २८८ शाळांना त्याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्रात सध्या दुष्काळीस्थिती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालक सुनील चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे. राज्य शासनाने १८१ तालुक्यांमध्ये यावर्षी दुष्काळीस्थिती घोषित केली आहे.अशा दुष्काळी २६ जिल्ह्यातील ४० हजार २८८ शाळा दुष्काळग्रस्त भागात येतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीच्या कालावधीतही दररोज पोषण आहार शिजवून द्यावा लागणार आहे. शिवाय आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध, फळे व इतर पौष्टीक आहार द्यावा, अशी सूचना संचालकांनी केली आहे. तर दुष्काळी भागात न मोडणाऱ्या इतर शाळांना मात्र केवळ शैक्षणिक सत्र संपेपर्यंतच पोषण आहार पुरविण्याचे आदेश संचालकांनी दिली आहे .