नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खंडणीसाठी चार विद्यार्थ्यांनी वर्ग मित्राचे अपहरण केले, त्यानंतर त्याला जंगलात नेऊन जमिनीत पुरले. घटनेच्या ६ व्या दिवशी मृत विद्यार्थ्याच्या वडिलांना फोन करून आठ लाखांची खंडणी मागितली, प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर बारावीला असलेल्या या चारही जणांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. तसेच पोलिसांनी मृत अभिषेकचा मृतदेह जंगलातून मिळवला आहे. जंगलातील कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडल्याने त्याचे डोके वेगळ्या ठिकाणी पडल्याचे आढळून आले.
तिर्वा शहरातील अन्नपूर्णानगर येथील रहिवासी गोपाल राजपूत ठठिया रोडवर लोकांचा इलाज करतात. त्यांचा मुलगा अभिषेक (वय १६) हा शहरातील महेंद्र नीलम जनता इंटर कॉलेजमध्ये इंटर विद्यार्थी होता. ४ फेब्रुवारीला त्याच्याबरोबर शिकत असलेल्या परिसरातील दोन मित्र प्रवेश कार्ड घेण्याच्या नावाखाली कॉलेजमध्ये गेले होते, परंतु त्यांनी त्याचे अपहरण केले आणि जंगलात घेऊन गेले आणि त्याचा खून करून मृतदेह पुरून टाकला. मुलगा घरी न आल्यामुळे कुटुंबातील लोक चिंतीत झाले. पाच फेब्रुवारी रोजी वडिलांनी आपला मुलगा अभिषेक गायब असल्याची तक्रार दाखल केली. ५ फेब्रुवारी रोजी गोपाळ यांनी मुलाच्या कोतवालीत बेपत्ता झाल्याचा अहवाल दिला. १० फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गोपाळ यांच्या फोनवर कॉल केला आठ लाखांची खंडणी मागितली.
गोपाळ यांनी तिर्वा कोतवाल टीपी वर्मा यांना ही माहिती दिली. १२ फेब्रुवारी रोजी मोबाइल नंबरच्या आधारे टीम त्याच्या मित्रांकडे पोहोचली. आरोपीच्या चार मित्रांना अटक झाल्यानंतर या घटनेची माहिती देणार्या एसपी अमरेंद्र प्रसाद सिंह यांनी चौकशीत सांगितले की, चार वर्गमित्रांनी आठ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. पोलिसांनी चारही आरोपीना ताब्यात घेतले तसेच मृतदेह पुरल्याच्या ठिकाणाहून अभिषेकचा सांगाडा, बूट आणि हत्या केलेले हत्यार जप्त केले. एसपी अमरेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणामध्ये चारही आरोपींसोबत एखादा सराईत गुन्हेगार असल्याचा संशय आहे. त्यामुळे पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.