मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात २२ नवे जिल्हे आणि ४९ तालुके निर्मितीचा प्रस्ताव असून मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करून हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २०१८ मध्ये मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला असून या समितीत वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त होते. या समितीसमोर महाराष्ट्रात २२ नवीन जिल्हे आणि ४९ नवे तालुके असा प्रस्ताव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव असून नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण जिल्ह्याच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. तसेच मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण असे दोन जिल्हे तयार होऊ शकतात. तर लातूर जिल्ह्यातील उदगीरला जिल्हा म्हणून मान्यता देणार असून कर्नाटक सीमावर्ती भागाला लागून असलेला उदगीर तालुका हा शिक्षण, व्यापार आणि अन्नधान्याची बाजारपेठ यासाठी प्रसिद्ध असून उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी मागील वर्षांपासून केली जात आहे. तसेच त्यासाठी आंदोलनही करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी आणि जळकोट हे तालुके त्यात समाविष्ट होणार असून नळेगाव हा तालुका नव्याने होईल. तसेच नांदेड जिल्ह्यातील मुकरमाबाद हा तालुका नव्याने तालुका होऊन उदगीरमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. नांदेडमधील देगलूर आणि मुखेड हेही उदगीरला जोडले जाऊ शकतात.
कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ?
ठाणे – मीरा-भाईंदर, कल्याण
बुलढाणा- खामगाव
नाशिक – मालेगाव आणि कळवण
भंडारा – साकोली
यवतमाळ – पुसद
अमरावती – अचलपूर
चंद्रपूर – चिमूर
गडचिरोली – अहेरी
जळगाव – भुसावळ
लातूर – उदगीर
बीड – अंबेजोगाई
नांदेड – किनवट
सातारा- माणदेश
पुणे- शिवनेरी
पालघर – जव्हार
रत्नागिरी – मानगड
रायगड – महाड
अहमदनगर – शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर
Visit : bahujannama.com