नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – काल नाशिकच्या कळवण मालेगाव रोडवर भीषण अपघात झाला. त्यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे अनेकांच्या घरात शोककळा पसरली आहे. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी वाचल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
चुलत भावजयीच्या अंत्यविधीवरून परत येत असताना बाळासाहेब चिंधा निकम आणि त्यांचे धाकटे भाऊ शांताराम चिंधा निकम यांचा या अपघातात मृत्यू झाला असून ते दोघे सलून व्यावसायिक आहेत. तर त्या दोघांचा जीव गेला असून त्या दोघांच्या पत्नी बचावल्या आहेत.
तसेच या अपघातात मालेगाव येथील अन्सारी कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला असून मालेगावकडून कळवणकडे जाणारी ही बस होती. बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे तितक्यातच बससमोर रिक्षा येऊन तिला धडक बसल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहरीत जाऊन पडली. यामध्ये ऍपे रिक्षामधील ९ आणि बसमधील ४८ प्रवासी अडकले होते. तसेच अन्सारी कुटुंब आपल्या घरातील मुलाचे लग्न जमवण्यासाठी देवळा येथे आले होते. तेथून परत येत असताना कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला असून तसेच वैवाहिक जीवन सुरु होण्याअगोदरच तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Visit : bahujannama.com