बहुजननामा ऑनलाईन : भारतात सुरु असलेल्या मंदीमुळे वाहन निर्मिती कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. काही कंपन्यांनी आपले उत्पादन थांबवले आहे, तर होंडा , मारुती सारख्या अनेक मोठमोठ्या कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यात आता मारुती – सुझिकीचे गुरुग्राम आणि मानेसर या प्रकल्पातील उत्पादन दोन दिवस थांबवण्यात आले आहेत. त्यामुळे मंदीमुळे उत्पादन थांबवणारी मारुती ही पहिली कंपनी ठरली आहे.
मारुती सुझुकीने त्यांच्या हरियाणातील गुरुग्राम आणि मानसेर प्रकल्पातील उत्पादन ७ आणि ८ तारखेला बंद ठेवले आहे. कंपनीने हे दोन्ही दिवस ‘नो प्रोडक्शन डे ‘ म्हणून घोषित केला आहे. २०१२ नंतर पहिल्यांदाच उत्पादन बंद ठेवण्याची वेळ कंपनीवर आली आहे. त्यामुळे कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
वाहनाची संख्या वाढली किंवा खरेदी कमी झाली तर कंपनी आपले उत्पादन कमी करते. परंतु मंदीचा फटका बसल्याने मारुती कंपनीला आपले उत्पादन थांबवावे लागले आहे. त्यामुळे दोन दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.