बहुजननामा ऑनलाईन- जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार्या कलम ३७० मधील तरतुदी रद्दबातल केल्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर जनतेने प्रचंड पाठिंबा दिला. याचाच एक भाग म्हणून भाजपाने एक लघु चित्रफीत प्रदर्शित केली आहे. भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ही चित्रफित प्रदर्शित करण्यात आली आहे.
दहा मिनिटांच्या या चित्रफितीत कलम ३७० च्या विरोधात पक्षाचे मत मांडण्यात आले आहे. कलम ३७० ही ‘ऐतिहासिक चूक’ असल्याचे वर्णन असलेल्या या चित्रफितीत दहशतवादाला चालना देऊन लोकशाही आणि विकासाच्या विरोधात काम केल्याचा संदेश यात देण्यात आला आहे. या चित्रफितीत देशातील पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना खोऱ्यातील समस्यांसाठी आरोपी ठरविण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, तर सरदार पटेल यांनी इतर राज्यांमध्ये यशस्वीरित्या संघात विलीन केले. असे व्हिडिओमध्ये असे नमूद करण्यात आले आहे. परंतु भाजप या विषयावरील आपल्या भूमिकेपासून कधीही भटकले नाही आणि संसदेच्या पहिल्या अधिवेशनात प्रचंड बहुमताने सत्ता परत मिळाल्यावर कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला.
एक ऐतिहासिक भूल की वजह से 70 साल तक जम्मू-कश्मीर की धरा रक्तिम होती रही।
लाखों नागरिक अपने अधिकारों से वंचित रहे, बच्चों को पत्थर थमाए जाते रहे।
मोदी सरकार के दृ़ढ़ निश्चय से अब भारत में दो विधान, दो प्रधान और दो निशान का प्रावधान हमेशा के लिए खत्म हो चुका है।
एक लघु फिल्म। pic.twitter.com/2KTqZpUF7L
— BJP (@BJP4India) September 4, 2019