मुंबई बहुजननामा ऑनलाईन – घरापासून शाळा एक किलोमीटरपेक्षा दूर अंतरावर असल्यास पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाहतुक भत्ता मिळणार आहे. मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत १ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शाळा असल्यास विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. तर ज्या खेड्यांमध्ये किंवा वस्त्यांवर १ ली ते ५ वी पर्यंतच्या शाळा १ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास तीन किलोमीटरर्यंत शाळा नसल्यास विद्यार्थ्यांना वाहतुक भत्ता दिला जाणार आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना काही वेळा बससेवा उपलब्ध नसते. वाहनांची सोय नतसेच अशावेळी शिक्षण घेण्याची इच्छा असते. तर काही वेळा आर्थिक अडचण, हलाखीची परिस्थिती यामुळे खेड्यापाड्यांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते. या भीषण समस्येला पाहून हा विद्यार्थ्यांना वाहतुक भत्ता दिला जाणार आहे.
यासाठी शाळा १ किलोमीटरपेक्षा दूर असेल आणि तीन किमीच्या आत शाळा नसेल अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या राहत्या घराची माहिती पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचलनालयाला द्यायची आहे. शिक्षण परिषदेच्या बैठकित या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.