मुंबई: पोलीसनामा आॅनलाइन
‘तिसरी आघाडी करण्यापेक्षा सर्वांना एकत्र घेत महाआघाडी करू’ असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मांडला. मुंबईतील राजगृहात राजू शेट्टी व प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक पार पडली. यावेळी ते बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार कपिल पाटील आणि स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हेही बैठकीला उपस्थित होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca523fbd-c94e-11e8-94b5-e340e1c97525′]
२०१९ च्या निवडणूका जवळ येत आहेत. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राजू शेट्टी हे आंबेडकर-आेवेसींच्या नव्या बहुजन विकास वंचित आघाडीत जाणार का ? असा प्रश्नही समोर येत असून लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. राजू शेट्टी यांनी भाजपविरोधी सर्वांनी एकत्र यावे असे अवाहन करत, तिसऱ्या आघाडीपेक्षा महाआघाडी करु, असा प्रस्ताव शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकरांसमोर मांडला आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf959a17-c94e-11e8-ae96-7100f0c5eb6a’]