पुणे : बहुजननामा ऑनलाईन -शिवसेनेचा राममंदिर बांधणीसाठी प्रयत्न चालू आहेत. हि एक चांगली बाब आहे, मात्र अध्यादेश काढून किंवा कायदा करून मंदिर होत नसते, सामोपचारानेच हा मुद्दा सोडवावा लागेल. त्यामुळे न्यायालय काय निकाल देईल याची वाट पाहावं लागेल. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपले मत व्यक्त केले.
( २५ नोव्हेंबर ) रविवार पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राममंदिराचा मुद्दा उचलून धरत अयोध्यावारी केली. तेथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र राममंदिराचा वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी तेथे एखादी संस्था उभारावी. जेणेकरून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत. राममंदिर प्रश्नावर अयोध्येतील हिंदू-मुस्लिमांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. इतकेच नव्हे तर राममंदिराला आमचा विरोध नाही. पण बेकायदेशीररीत्या ते उभारण्याचा प्रयत्न कोणी करू नये. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मंदिर बांधू इच्छिणाऱ्यांनी शांत राहावे. असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
याचबरोबर शनिवारवाड्यावर झालेल्या ‘एल्गार परिषदे’चा ‘१ जानेवारी राेजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीशी संबंध नसल्याचे मी वारंवार सांगत आहे. विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंविरोधात पुरावा नसल्याचे पोलिस सांगतात, पण त्यांनी कसून तपास करायला हवा. असेही त्यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर कोरेगाव – भीमाची दंगल पूर्वनियोजित होती. पोलिस तपासात म्हणत आहेत की संभाजी भिडेंविरुद्ध पुरावा नाही. त्यामुळे त्याचा पुन्हा कसून तपास व्हायला हवा. कोरेगाव भीमाची दंगल पूर्वनियोजित होती. चाैकशी आयोगामार्फत लवकरच माहिती पुढे येईल. या वेळचा कोरेगाव भीमाचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देऊ. असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
यावेळी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, राष्ट्रीय सचिव एम. डी. शेवाळे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित होते.