पुणे : बहुजननामा ऑनलाईन-अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल हिंदू व मुस्लिम दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल. त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदिर बांधू नये, तरी सर्वांनी थोडे सबुरीने घ्यावे. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
रविवार ( २५ नोव्हेंबर ) आयोजित पत्रकार परिषदेत अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल हिंदू व मुस्लिम दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल. त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदिर बांधू नये, तरी सर्वांनी थोडे सबुरीने घ्यावे. इतकेच नव्हे तर मंदिर बांधण्यासाठी केंद्र सरकारवर अध्यादेश काढण्या बाबत दबाव आणू नये. याचबरोबर भारतीय जनता पार्टीने मुस्लिम समाजच्या भावनांचा विचार करावा. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा उचलून धरत अयोध्येला भेट दिली. त्यांना साधू संतांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राममंदिरासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहेत हि एक चांगली बाब आहे. मात्र तरीही राम मंदिराबांधणी साठी अध्यादेश काढण्यासाठी कोणीही आग्रही राहू नये असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले.
यावेळी, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, राष्ट्रीय सचिव एम.डी. शेवाळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम आघाडी सचिव परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे, शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे, महिपाल वाघमारे आदी उपस्थित होते.