पुणे : बहुजननामा ऑनलाइन –क्रांतिसूर्य ज्योतिबाफुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनास तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बोडले यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पुण्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ज्यांच्या आदर्शाने महाराष्ट्रत समाज क्रांती घडली व नवसमाज समाज उभा राहिला त्यातून बालशाही राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणाचा पाया रोवला, महिला शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे दार ज्यांच्यामुळे आज खुले झाले आहे. असे क्रांतिसूर्य ज्योतिबाफुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनास तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बोडले यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाज समाजउपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत. तसेच समाजसुधारकांनी जो आदर्श घालून दिला आहे त्याच पावलावर पॉल ठेऊन राज्य प्रगती करीत आहेत. त्यातून नवनवीन योजना राबविल्या जात असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्च २०१८ मध्ये लोकसभेत क्रांतिसूर्य ज्योतिबाफुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा शी मागणी केली होती. दरम्यान स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस, राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते.
विशेष म्हणजे २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हंटले होते.