मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – धनगर समाज सध्या सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे अस्वस्थ असून यावर लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे आहे अशी आग्रही भूमिका विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात घेतली.
दरम्यान खांद्यावर घोंगडी घेवून आलेले आमदार रामराव वडकुते यांनी उपस्थित केलेल्या धनगर आरक्षण प्रश्नाला दुजोरा देत धनंजय मुंडे यांनी आपले मत मांडले. यंदा आषाढी पूजेला धनगर समाजाने विरोध करावा अशी सरकारची अपेक्षा आहे का? असा चिमटाही धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना काढला.
धनगर आरक्षणाविषयी केंद्रसरकारने वारंवार सांगितले आहे की, त्यांच्याकडे राज्य सरकारने धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करण्यासाठी कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे पहिल्या कॅबिनेटमध्ये केंद्राकडे शिफारसीच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला क्या हुआ तेरा वादा ? असा जाब धनगर समाजाने विचारला आहे.
या अधिवेशनात सरकारला टिसचा एटीआर सहज सादर करता आला असता मात्र सरकारने पुढच्या अधिवेशनापर्यंत वेळ मारून नेली आहे त्यामुळे सरकारच्या भूमिकेविषयी सर्वांना संशय आहे.