पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मराठा क्रांती मोर्चा व भीमा कोरेगाव प्रकरणी झालेला हिंसाचार यामध्ये हजारो तरूणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. पंरतु आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत एक घोषणा केली. सदर प्रकरणातील सर्व गुन्हे गुन्हे मागे घेतले जातील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. परंतु सर्वच गुन्हे नाही तर पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांसारखे गंभीर गुन्हे यातून वगळले जातील. पोलीसांवर झालेले गुन्हे वगळता शेकडो गुन्हे मागे घेतले जातील असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चा व भीमा कोरेगाव प्रकरणी झालेला हिंसाचार यामध्ये हजारो तरूणांना निष्कारण गोवण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. तसेच अनेक तरूणांचे भवितव्य यामुळे धोक्यात येऊ शकतं अशी भीती व्यक्त करत हे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. यावर आता मुख्यमत्र्यांनी गुन्हे मागे घेण्यासाठी घोषणा केली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भातील संपूर्ण आकडेवारीच आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आणि यानंतर सकारात्मक प्रतिसाद देत हे सर्व गुन्हे मागे घेत असल्याचेही घोषित केले. या संदर्भातली सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे…
मराठा मोर्चा दरम्यानचे गुन्हे
एकूण गुन्हे दाखल –५४३
गंभीर गुन्हे, जे मागे घेता येणार नाहीत – ४६
गुन्हे जे अ अंतिम प्रकारात मोडतात – ६६
आरोपपत्र दाखल झालेले परंतु मागे घेण्यात येणारे गुन्हे – ११७
चौकशी सुरू असलेले व मागे घेण्यात येणारे गुन्हे – ३१४
भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे
एकूण दाखल गुन्हे – ६५५
गंभीर गुन्हे, जे मागे घेता येणार नाहीत – ६३
गुन्हे जे अ अंतिम प्रकारात मोडतात – १५९
आरोपपत्र दाखल झालेले परंतु मागे घेण्यात येणारे गुन्हे – २७५
चौकशी सुरू असलेले व मागे घेण्यात येणारे गुन्हे – १५८