मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विरोधकांनी आज अधीवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारला धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणावर तुमची भूमिका काय असा खडा सवाल विचारून धनगर आणि मुस्लिम आरक्षणावर रान तापवले असल्याची चर्चा आज विधानभवन परिसरात घडत असल्याचे पाहायला मिळाले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आल्यावर धनगर आणि मुस्लिम आरक्षणावर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न आता विरोधकांनी आरंभला आहे. धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गात समाविष्ठ करण्यासाठी धनगर समाजाकडून मागील काही वर्षांपासून आंदोलन छेडले जाते असून सध्या धनगर समाज व्हीजेएनटी कोट्यात समाविष्ठ आहे. परंतू धनगर समाजाकडून त्यांचा समावेश अनुसूचित जातीत करावा असा पवित्रा घेण्यात आला आहे. या संदर्भांत सरकारने धनगर जातीचा समावेश अनुसूचित जातीत करण्यासाठी आणि केलेला समावेश न्यायालयीन लढाईत टिकण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला धनगर आरक्षणासाठी जातीचे संशोधन करण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीने अहवाल सरकारला दिल्याची पुष्टी महादेव जानकर यांनी मागील काही दिवसात दिली होती. मुस्लिम आरक्षणासाठी दोन्ही काँग्रेसचे विधिमंडळ सदस्य आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या अपयशाच्या मुद्यावर विधिमंडळात घेरून विरोधकांनी जनमत आपल्या बाजूने वळवण्याची रणनिती आखली आहे. त्यांच अनुषंगाने आजचे विधानभवनाच्या पायऱ्यावरचे आंदोलन होते असे म्हणले जाते असे. तर एम आय एम च्या दोन आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात आम्हाला जल्लोष करण्याचा मोका कधी देणार अशा आशयाचे फलक झळकवले आहेत त्यांच प्रमाणे आगामी दिवसात सरकारचा आरक्षणाच्या मुद्द्यावर खीस पडण्याचा मनसुबा विरोधकांनी अंगी बानला आहे. तसेस सरकारला धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर घेरण्यासाठी विरोधक एकवटले आहेत.