मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मी नेहमी हवेचा अंदाज पाहून माझे राजकीय निर्णय घेत असतो त्यामुळे सध्या भाजपची हवा आहे आणि त्याची हवा राहील असे मला वाटते आणि त्यांची हवा ओसरल्यावर बघू कोठे जायचे ते असे व्यक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
आठवले यांच्या अश्या व्यक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगात आली आहे. आठवले आगामी काळात भाजपची साथ सोडणार का? असे प्रश्न विचारून राजकीय खल माजवला जातो आहे. शुक्रवारी मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खानही उपस्थित होते. त्याच कार्यक्रमात रामदास आठवलेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आठवले यांना कॉग्रेस सोबत यावे असे जाहीर आवाहन केल्या नंतर आठवले यांनी खान यांना कोपर खिळी मारत म्हणाले कि मी कॉग्रेस सोबत १५ वर्ष होतो त्यामुळे मला सध्या तरी कॉग्रेस सोबत जावे वाटत नाही. परंतु आगामी काळात हवा पाहून निर्णय घेऊ असे व्यक्तव्य आठवले यांनी केले.
बऱ्याच वर्षातून आपल्याला मंत्री पद मिळाले आहे. अर्थात मंत्रिपद असल्याने जनता माझ्या पाठीशी आहे असे नाही मंत्री पद नसताना हि जनता माझ्या पाठीशी ठाम उभी होती आणि आगामी काळात हि राहील असे मत रामदास आठवले यांनी व्यत केले आहे.
विशेष म्हणजे रामदास आठवले हे दलित पँथरच्या चळवळीतून आलेले नेते आहेत. रामदास आठवले हे विद्यार्थी असल्यापासून दलित आंदोलनात असल्याने त्यांना राजकारणाची नस अचूक माहिती आहे . दलित पँथरचे नेतृत्व काही काळ केल्या नंतर त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची स्थापना करून दलितांची मोठी चळवळ उभा केली . त्याच्या मागे दलितांची एक पिढी जोडली गेली आणि आठवले यांनी दलितांच्या हक्काचे राजकारण सुरु केले.
आठवले यांचे आज राज्यभर संघटन कार्यरत असून आठवले यांच्या राज्यव्यापी संघटनाची दखल कॉगेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांनी हि वेळोवेळी घेतली आहे. रामदास आठवले कॉगेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पाठिंब्यावर दोन वेळा पंढरपूर राखीव मतदारसंघातून लोकसभेवर गेले आहेत . आठवले यांची राजकीय शक्ती आपल्या छत्र छायेत वाढत चालली आहे या विचारातून दोन्ही कॉग्रेसने मिळून २००९ साली त्यांनी आठवलेंचा शिर्डीत पराभव घडवून आणला आणि त्याक्षणापासूनच आठवलेंनी कॉग्रेसच्या आघाडीवर उघड टीकेस सुरुवात केली आणि त्यांनी कॉग्रेस आघाडीला सोड चिठ्ठी दिली. आज आठवले भाजप कडून राज्यसभेवर सदस्य असल्याने केंद्रात राज्यमंत्री आहेत. आठवले यांच्या संघटनांचा वापर करून सत्तेची गणिते जुळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात गेली २० वर्षे सुरु असून आठवले हे राज्यातील सत्तेचे महत्वाचे सूत्र आहे .आठवले यांची राजकीय शक्ती प्रचंड असून त्यांचे राजकीय पतन नजीकच्या काळात तरी संभव नाही. म्हणूनच रामदास आठवले नेहमी बिनदास्त वक्तव्य करत आहेत .