अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या दहा टक्के आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाजाला होणार आहे. असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
अहमदनगर येथे आयोजित सभेत आर्थिक निकषांवर दिल्या जाणाऱ्या दहा टक्के आरक्षणाचा सर्वात जास्त फायदा मुस्लिम समाजाला होणार आहे. असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. इतकेच नव्हे तर सवर्णांसाठी देण्यात आलेले १० टक्के आरक्षण हे मोदी सरकार साठी त्रासाचे ठरणार आहे. असा दावाही त्यांनी केला. याचबरोबर केंद्र सरकारने नव्याने दिलेल्या आरक्षणासाठी जे निकष ठेवले आहेत, त्यात बहुतांश मुस्लिम कुटुंब येतात. त्यामुळे भाजपा वरून भगवी आणि आतून हिरवी आहे. अशी टीकाही त्यांनी कोली. इतकेच नव्हे तर असा प्रचार आता चाललेला आहे. हे सरकार हिंदूंचे की मुस्लिमांचे असा प्रश्न विचारला जातोय. त्याला हे तोंड देऊ शकत नाहीत. आम्ही मात्र आनंदी आहोत. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे, मोदी सरकारने आर्थिक निकषावर दिलेले दहा टक्के आरक्षण टिकेल असे वाटत नाही. असे माताही त्यांनी मत व्यक्त केले. याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी टीकास्त्र सोडले.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी फांद्या तोडण्याचे काम करते. मुळावर कारवाई करीत नाही. कारवाई करायची होती तर व्हीपप्रमाणे कारवाई करायला पाहिजे होती. असेही ते म्हंटले. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्यांच्यावरही कारवाई केली नाही. नगरसेवकांवरील कारवाई फक्त दिखावा आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात फार सख्य आहे. शिवसेना कधी सत्तेतून बाहेर पडते याची राष्ट्रवादी वाट पहात आहे. शरद पवार धर्मनिरपेक्ष असतील मात्र त्यांचा पक्ष नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
दरम्यान आगामी लोकसभेच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. मात्र अद्यापही दोन्ही काँग्रेसचे उत्तर आलेले नाही. मात्र आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. आघाडी झाली नाही तर पक्ष महाराष्ट्रातील ४८ जागा लढविणार आहे. असेही ते म्हंटले.