औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – भाजपा सरकारने चार वर्षांत ओबीसी महामंडळाला पैसे दिले नाहीत आणि आताच ७०० कोटी देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु आत्ताच का ? माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केला.
कन्नड येथील येथील बंजारा तरुण योगेश राठोड याचा कारागृहात अधिकार्यांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ वंचित बहुजन नेत्यांशी चर्चा करण्यासाठी औरंगाबादमध्ये गेले असता, त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. या राज्यात काय चालले आहे, कारागृहातील लोकांनी तरुणाचा खून का केला, कुणी अधिकार दिला तुम्हाला मारण्याचा. असा संतप्त सवाल त्यांनी केला. इतकेच नव्हे तर त्यावेळी भाजपा सरकार आणि त्यांच्या नेत्यांचा चांगलाच समाचारही त्यांनी घेतला. दरम्यान एक थेंब गुजरातला देता कामा नये, महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच मिळाले पाहिजे. असा लढा उभारला गेला पाहिजे. असेही त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे, कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांनी लिहिले म्हणून संपवण्यात आले. आज कोणीही सुरक्षित नाही. पत्रकारांनी विचार मांडले म्हणून त्यांनाही वृत्त वाहिन्यांमधून जावे लागले आहे. असा आरोपही त्यांनी केला. याचबरोबर चार वर्षांत ओबीसी महामंडळाला पैसे दिले नाहीत आणि आताच ७०० कोटी देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु आत्ताच का? आताच कळवळा का आला आहे ? असे प्रश्न उपस्थित करत, ओबीसींना कशाला फसवता. आधी मुलांच्या शिष्यवृत्तीचे पैसे द्या मग हा जुमला करा. असेही त्यांनी म्हंटले.
इतकेच नव्हे तर मोदी विरुध्द संविधान अशी ही लढाई आहे. या लढाईत सहभागी आणि परिवर्तन घडवा असे आवाहनही त्यांनी केले.