पुणे : बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपात बारा जागा मागितल्या तरी चर्चा होत नाही. मनूवाद रोखण्यात त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे संविधानाचे रक्षण करून सत्तेत जाण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे’, असे आवाहन केले आहे. इतकेच नव्हे तर ‘समझोता झाला तर ठीक, नाही झाला तर आम्ही सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही’, असा इशाराही दिला आहे.
सोमवारी ( २६ नोव्हेंबर ) संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीने संविधान सन्मान सभा आयोजित केली होती. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपात बारा जागा मागितल्या तरी चर्चा होत नाही. मनूवाद रोखण्यात त्यांना काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे संविधानाचे रक्षण करून सत्तेत जाण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे’, असे आवाहन केले आहे. इतकेच नव्हे तर ‘समझोता झाला तर ठीक, नाही झाला तर आम्ही सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. याचबरोबर सिंचन घोटाळ्यात कोणाचे हात अडकले आहेत, ते मुख्यमंत्री सांगत नाहीत. मराठा आरक्षणाचा अहवाल सादर झाल्यावर विधानसभा भंग केली जाण्याची शक्यता आहे. मग, तडजोड आम्ही करत आहोत का तुम्ही? साटेलोटे कोणाचे कोणाशी आहे? असा सवालही त्यांनी केला.
विशेष म्हणजे ‘देशातील वंचित विधानसभेत, संसदेत गेलाच पाहिजे’, इतकेच नव्हे तर ‘सत्तेत वाटेकरी नको, म्हणून जागावाटपाबाबत बोलायला तयार होत नाहीत. भाजपला मदत करता, असा प्रचार वंचित बहुजन आघाडीबाबत केला जातो. मात्र, काँग्रेस आणि भाजपचे नाते काय, ते मला चांगले ठाऊक आहे. धर्मनिरपेक्षतेचा ठेका आपणच घेतला, असे काँग्रेसला वाटते. मात्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका झाल्यावर तुमचा खरा रंग बाहेर काढीन’ असेही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
दरम्यान बहुजन, मागासवर्गीय आणि मुस्लिम एकाच व्यासपीठावर आल्यास २०१९ ला वंचितांची सत्ता येईल असे म्हणत ‘अब की बार आंबेडकर सरकार’ असा नारा एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी दिला.
यावेळी भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने, धनगर समाजाचे नेते विजय मोरे, हरिभाऊ भदे, प्रा. अंजली आंबेडकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने, महिला राज्य संघटक रेखा ठाकूर, प्रा. किसन चव्हाण, आमदार बळीराम सिरस्कर, प्रा. हेमराज उईके, शंरराव लिंगे, अमित भुईगळ, आयोजक अतुल बहुले आदी उपस्थित होते.