नवी दिल्ली : वृत्तसंस्था –रामलीला मैदान येथे भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी दलित मतदारांना आकर्षिक करण्यासाठी ‘भीम महासंगम’ या कर्यक्रमाचे आयोजन केले. त्यावेळी एकाच भांड्यात ५हजार किलोची खिचडी शिजवून हिंदू एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे दिसून येते.
भाजपच्या कार्यक्रमासाठी रामलीला मैदानात जोरदार तयारी करण्यात आली असून राम लीला मैदान आता भाजपमय झाले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळ पासून या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली असून ५ हजार किलो खिचडी बनवायला सुरुवात केली आहे. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हि खिचडी बनवत आहेत. हि खिचडी बनवण्यासाठी तीन लाख अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरून तांदूळ आणि डाळ गोळा करून आणण्यात आली आहे. आता रॅलीला सुरुवात झाली असून भाजप या रॅली द्वारे सर्वात जास्त खिचडी शिवण्याचा विक्रम करू पाहते आहे. या अगोदर ९१८ किलो तांदुळाची खिचडी बनवण्याचा विक्रम जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. तोच विक्रम मोडण्याची तयारी भाजपने केली आहे.
या कार्यक्रमासाठी दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, भाजप महासचिव रामलाल,केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या सहित अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. या रॅलीत ५० हजार लोक समाविष्ट होण्याची शक्यता असून ५ हजार किलो खिचडी बनवण्यासाठी विशिष्ठ भांडे तयार करून घेण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपच्या लोकसभा निवडणुकीचा तयारी भाग मानण्यात येते आहे. सामाजिक समरसता हि भाजपची दलितांना जवळ करण्याची संकल्पना आहे. भाजपच्या कडव्या हिंदुत्वाच्या छबीचा तोटा पक्षला होत आहे त्याच प्रमाणे याच पवित्र्यामुळे भाजप पासून लोक दूर चालले आहेत. हे चांगलेच जाणून असलेल्या भाजपने आता समरसतेचा नवा उपक्रम म्हणून ‘भीम महासंगम’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.