जालना : बहुजननामा ऑनलाइन
शिवप्रतिष्ठानतर्फे जालना येथी आयोजित कार्यक्रमात संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांनी गोंधळ घातला आहे. दरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला असून. काही जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे.
जालना येथील आर्य समाज मंदिरात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची ३२ मण सुवर्ण सिंहासनाच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान संभाजी ब्रिगेड आणि काही दलित संघटनांनी गोंधळ घातला. इतकेच नव्हे तर संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला तसेच काही जणांना ताब्यातही घेतले. इतकेच नव्हे तर गोंधळ झाल्यानंतर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात संभाजी भिडे गुरुजींचा कार्यक्रम पार पडला.
विशेष म्हणजे शिवप्रतिष्ठानचे
संभाजी भिडे यांना जालन्यात येण्यापासून थांबवावे, अन्यथा दंगल होण्याची
शक्यता नाकारता येत नाही. असा गर्भित इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष
तुळशीराम चंद, वंचित आघाडीचे नेते सुधाकर निकाळजे, अन्याय प्रतिकार दलाचे
संस्थापक अध्यक्ष दादाराव लहाने, भारिपचे नेते भास्कर शिनगारे, यांनी दिला
होता. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची कुठलीही जाहीर सभा किंवा
जाहीर कार्यक्रम नसल्यामुळे संभाजी भिडे गुरुजींना जालन्यात येण्यापासून
थांबविता येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिले होते असे समोर आले होते.