मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आपल्या समाजात गटांचे राजकारण नको सर्व नेते एकत्र येत असतील तर मी माझे मंत्री पद सोडायला तयार आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. शिवाजी पार्क मैदानात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत त्यांनी हे प्रतिपादन केले.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य समता बंधुता व लोकशाहीच्या मूलभूत तत्त्व प्रणालीवर आधारित विज्ञाननिष्ठ राज्यघटना बहाल केली आहे. इतकेच नव्हे तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, तसेच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्व प्रणालीवर आधारित विज्ञाननिष्ठ राज्यघटना बहाल केली आहे.
विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे, आज रिपब्लिकन पक्षात विविध जाती-जमाती, बलुतेदार,आलुतेदार, मराठा, ब्राह्मण समाज काम करीत आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या समाजात गटांचे राजकारण नको, सर्व नेते एकत्र येत असतील तर मी माझे मंत्री पद सोडायला तयार आहे. असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलले जाणार नाही असे झाले तर मी रामदास आठवले त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीही सांगत आहेत की डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाहीत. इतकेच नव्हे तर इंदू मिलचे स्मारक २०२० पूर्वी होणार आहे. त्यामुळे त्याचा प्रचार करू नका असेही त्यांनी म्हटले.
यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर सीमाताई आठवले महात्मा फुले महामंडळाचे राजाभाऊ सरवदे काकासाहेब खंबाळकर पप्पू कागदे उपस्थित होते.