मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी देशात दंगली घडवल्या जाणार आहेत. आधी भीमा कोरेगाव झाले आता आयोध्येचा नंबर आहे. असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
६ डिसेंबर महामानव डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दरवर्षी २५ लाख अनुयायी येत असतात. दरम्यान आयोजित आभिवादन सभेत लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी देशात दंगली घडवल्या जाणार आहेत त्यासाठी माणसही तयार ठेवली आहेत दोन दिवसापूर्वीच झालेली बुलंद शहराची दंगल त्या व्यापक कटाचाच भाग आहे . आधी भीमा कोरेगाव झाले आता आयोध्येचा नंबर आहे. असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले .
इतकेच नव्हे तर क्रांती आणि प्रतिक्रांती यांच्यात २०१९मध्ये आमनासामना होणार आहे, त्यावेळी संविधान बचाव लढाई ही तुम्हा आम्हा सर्वांना लढायची आहे. याचबरोबर ही लढाई सर्वांसाठी महत्त्वाची आहे असे आवाहनही त्यांनी केले.
याचबरोबर नागपूर येथे १९५६ साली दीक्षा समारोह झाला आणि पुढे इतिहास रचला गेला, आताही २०१९ मध्ये इतिहास घडणार आहे, इतकेच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे मात्र संविधानविरोधी भाजपाला आपल्याला सत्तेतून हद्दपार करायचे आहे, युद्धात सर्व काही माफ असते त्याच पद्धतीने आता निवडणुका लढवल्या जात आहेत. युद्ध आणि निवडणुका सारख्याच मानल्या जात आहेत. त्यामुळे आपल्याला भावनिक होऊन चालणार नाही तर रणनीती आखून लढाईला समोर जावे लागणार आहे. असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी देशभरातील विविध संस्था, तसेच संघटनांचे पदाधिकारी , याचबरोबर आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते .