पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन-२०१९ मध्ये विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले तरी भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’चे सरकार अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे आपण भाजपसोबतच राहणार आहोत असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
पंढरपूर येथील आयोजित पत्रकारपरिषदेत बोलतांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकास कामे केली आहेत. इतकेच नव्हे तर विरोधकांनी कितीही आकांडतांडव केला तरी २०१९ मध्ये पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’चे सरकार अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे आपण भाजपसोबतच राहणार आहोत असेही ते म्हंटले.
याचबरोबर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा ३०० आणि एनडीएच्या जागा ४०० च्या पुढे जातील, असा आमचा विश्वास आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेस ६०- ७० जागांच्या पुढे जाऊ शकणार नाही. पाच राज्यांच्या निवडणुका आता होत आहेत, त्यापैकी तीन राज्यांत भाजपची सत्ता निश्चित येईल. उर्वरित दोन राज्यांतही भाजप चांगले यश मिळवेल असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर रामजन्मभूमी आयोध्ये बाबत विचारले असता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हंटले की, काही जमीन हिंदूंना आणि काही जमीन मुस्लिमांना द्यावी. इतिहास बघितला, तर ती सगळी बुद्धाची भूमी आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकानंतर त्या ठिकाणी बुद्ध मंदिर होते. तिथे उत्खनन केले, तर बुद्धाचे अवशेष सापडतील. त्यामुळे जर सर्वधर्मसमभावाची भूमिका घ्यायची असेल, तर त्या ठिकाणी बुद्ध मंदिरासाठीसुद्धा काही जागा दिली पाहिजे. राममंदिर व्हावे, ही लोकांची भावना आहे. त्यानुसार मंदिर बांधायला हरकत नाही. कायमचा वाद मिटवायचा असेल, तर मशिदीसाठी त्या ठिकाणी दुसरी जागा देऊन हा वाद सोडवावा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मंदिर बांधण्याची घाई करू नये. मुस्लिमांवर दबाव टाकून मंदिर बांधू नये असेही ते म्हंटले.