मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कालच राज्यातील सहा जिल्ह्या परिषदांचा निकाल लागला असून यामध्ये भाजपनेही बाजी मारली आहे. महायुतीमध्ये एकत्र आलेले तीन पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मुख्यमंत्रीपदानंतर वेगळे झाले. परंतु भाजपला जास्त जागा मिळूनही त्यांना विरोधी पक्ष उभे राहावे लागले आहे.
निवडणूक आयोगाकडून आताच प्राप्त आकडेवारीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपा हा 106 जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. pic.twitter.com/Va0CPBLtMJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 8, 2020
महाविकास आघाडीने जिल्हा परिषदांमध्येही बाजी मारली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला यश मिळाले असून भाजपचा गड राखता न आल्याने देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धक्का बसला आहे. परंतु जिल्हा परिषदांच्या एकूण ३३२ जागांपैकी १०३ जागा भाजपला मिळाल्या असून काँग्रेसला ७०, शिवसेनेला ४९ तर राष्ट्रवादीला ४६ जागा मिळाल्या आहेत. तसेच पंचायत समितीच्या एकूण ६६४ जागांपैकी १९४ जागा भाजपला, राष्ट्रवादीला ८० तर शिवसेनेला ११७ जागा मिळाल्या आहेत.
पंचायत समिती निकालांमध्ये सुद्धा भाजपाच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.
एकूण जागा: 664
भाजपा: 194
काँग्रेस: 145
राष्ट्रवादी काँग्रेस: 80
शिवसेना: 117
अन्य: 128 pic.twitter.com/lYDna6TuLT— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 8, 2020
पण निवडणुकीची आकडेवारी तपासून पाहिली तर त्यामध्ये महाविकास आघाडीला जरी फायदा झाला असला तरी त्यातही काँग्रेस आणि शिवसेनेला जास्त फायदा झाला आहे. आणि राष्ट्रवादीला तितका फायदा झालेला नाही. वाशीम, नागपूर, पालघर सोडले तर राष्ट्रवादीला इतर ठिकाणी जास्त संख्याबळ मिळालेले नाही. वाशिममध्ये राष्ट्रवादीला १२ जागा, पालघरमध्ये १५ जागा मिळाल्या आहेत. पण येथे शिवसेनेला सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादीची मदत घ्यायची गरज पडेल अशी शक्यता आहे.