नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील तीन हजार लोकांवर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात धनबाद येथील स्थानिक पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला होता. पण आता झारखंड सरकारने त्या तीन हजार लोकांवरील गुन्हा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेला मदत करण्याचे आवाहन केले.
क़ानून जनता को डराने एवं उनकी आवाज़ दबाने के लिए नहीं बल्कि आम जन-मानस में सुरक्षा का भाव उत्पन्न करने को होता है।
मेरे नेतृत्व में चल रही सरकार में क़ानून जनता की आवाज़ को बुलंद करने का कार्य करेगी।
धनबाद में 3000 लोगों पर लगाए गए राजद्रोह की धारा को अविलंब निरस्त करने के 1/2 pic.twitter.com/Y0PMT84Vra
— Hemant Soren (@HemantSorenJMM) January 8, 2020
धनबादमधील वासेपूर परिसरात दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यावरून तीन हजार लोकांवर देशद्रोहाचा आरोप लावला गेला होता. त्यावर हेमंत सोरेन यांनी ट्विट करत ‘कायदा हा जनतेला घाबरवण्यासाठी किंवा त्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी नसून सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी असतो. माझया नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारमध्ये कायदा हा लोकांनी आवाज उठवण्याचे काम करेल. धनबादमध्ये तीन हजार लोकांवर लावला गेलेला देशद्रोहाचा कलम उशीर न करता रद्द करण्यात आला आहे आणि दोषी असलेली अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची शिफारस केली आहे. सोबतच मी झारखंडमधील बंधू / भगिनींना आवाहन करू इच्छितो की राज्य तुमचे आहे, येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करणे तुमचे कर्तव्य आहे,’ असे म्हटले.
पोलिसांनी सात जणांवर आणि तीन हजार अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला होता. प्रशासनाच्या परवानगीशिवाय या लोकांनी आंदोलन केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पथलगढी आंदोलनातील आरोपींवरील देशद्रोहाचा खटला मागे घेतला होता.