केरळ बहुजननामा : पावसाच्या अतिवृष्टीमुळे देशात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळला देखील पुराचा फटका बसला आहे, या महापुरामुळे केरळमध्ये ७२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. लाखो लोकांना आपले घरदार सोडून स्थलांतर करावे लागले आहे. तरी जवळपास ५८ लोक बेपत्ता असून जखमी झालेल्या लोकांची संख्या देखील ३२ वर गेली आहे. तरी देशभरातील लाखो लोक जात धर्म न पाहता मदतीसाठी हाथ पुढे करत आहेत. अशातच कन्नुरमधील मुस्लिम युथ लीग च्या कार्यकर्त्यांनी अम्मकोटम महादेव मंदिराची साफसफाई केली आहे.
दरम्यान , महापुरामुळे सलग दोन दिवसात या मंदिरात पाणी साचले होते, रविवारी जेव्हा पाणी कमी झाले, तेव्हा सगळ्या मंदिरात घाणीचे साम्राज्य होते. यानंतर मुस्लिम युथ लीग च्या कार्यकर्त्यांनी मंदिर साफ सफाईचे अभियान चालवत , संपूर्ण मंदिर स्वच्छ केले . केरळ मध्ये अजूनही पूरस्थिती आहे. डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी(केएसडीएमए) यांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही काही लोक बेपत्ता आहेत.
केरळ प्रमाणेच महाराष्ट्र , कर्नाटक, गुजरात तसेच मध्य प्रदेश राज्यांत देखील गंभीर समस्या निर्माण झाली आहे. देशभरातून जवळपास २२१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार , केरळ मध्ये तुफान वादळा सोबतच , अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तविली आहे. केरळ मध्ये आलेल्या पुरामुळे २. ५१ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रविवारी दुपारपासून कोची इंटरनेशनल एयरपोर्ट वर फ्लाईट सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलावली आहे. तसेच , यंदाची परिस्थिती मागील वर्षा इतकी खराब नसल्याचे देखील म्हंटले आहे. पूरस्थिती असलेल्या ठिकाणी बचावकार्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे.