दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याबद्दल वादग्रस्त वक्त्यव्य केल्याने दिल्लीतील महिलेने सासऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. महिलेचा आरोप आहे कि ती घरात एकटी असताना तिच्या सासऱ्यांनी तिच्या खोलीत येऊन वादग्रस्त वक्तव्य केलं. पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली आहे.
पीडित महिला हि आपल्या नवऱ्या आणि परिवारासोबत बख्तावरपूर गावात भाड्याच्या खोलीत राहत होती. तिचा नवरा कावड आणण्यासाठी हरिद्वारला गेला असता , २१ जुलै च्या रात्री आरोपी पीडितेच्या खोलीत आला. आपल्याला टच स्क्रीन चा फोन वापरता येत नाही. त्याला फोन लावणे शिकायचे आहे. यावर महिलेने लगेच तिच्या नंदेल फोन लावून दिला. फोन झाल्यानंतर आरोपी पुन्हा महिलेच्या खोलीत आला आणि तिच्याबद्दल वादग्रत वक्तव्य केलं.
घाबरलेल्या महिलेने बाहेर धाव घेत नवरा, आई आणि घरातील इतर सदस्यांना हि गोष्ट फोन वरून कळवली. महिलेच्या आईने लगेच १०० क्रमांकावर फोन करत पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली.
पोलीस लगेच घटना स्थळी दाखल झाली. महिलेने घरातील सर्व सदस्यांसोबत शुक्रवारी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.