बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांनी बिहार निवडणूक निकालावर ( bihar-assembly-election-
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. मला बिहारच्या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळाले. पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर होती. सुरुवातीपासून ते तिकीट वाटपापर्यंत, प्रचारापर्यंत मी सहभागी होताे. शेवटच्या टप्प्यात आजारी असल्याने उपस्थित राहू शकलो नाही. पण मोदींच्या सभांपर्यंत संपूर्ण व्यवस्थित होतो. हा एक वेगळा अनुभव असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रत्येक राज्याच्या निवडणुकीचा वेगळा अनुभव असतो. बिहारमध्ये काही असले तरी राजकीय प्रगल्भता प्रचंड आहे. सामान्य मतदार जागरूक आहे, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हाही तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी होत होती. लालूंच्या काळापासून ते होत आहे. पण त्याचं मतांमध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. शरद पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार साहेब मोठे नेते आहेत, त्यावर काही बोलायचे नाही. माझ्यामुळे निवडणूक जिंकलो असे मी म्हटलेलं नाही असे ते म्हणाले.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “चीत झाले तरी आमचं बोट वर आहे अशी आमच्या जुन्या मित्रांची सवय आहे. अशा प्रकारे ते नेहमीच युक्तिवाद करत असतात. मॅन ऑफ द मॅच, सीरिज नरेंद्र मोदी आणि भाजपच आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचले नाही, नोटापेक्षाही कमी मते मिळाली. शिवसेनेने याचं आत्मचिंतन केले पाहिजे, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, मला असे वाटत नाही. भाजपमध्ये कार्यकर्ते, नेते तयार करत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असतो. त्यातूनच ही संधी दिली आहे. अशा अनेक संधी मला मिळतील ज्यामुळे मलादेखील प्रगल्भता मिळेल, पण सध्या मी महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. महाराष्ट्रातील राजकारण पलटणार का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, आमच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आमच्या मतदारांचा, मोदींवर प्रेम करणाऱ्या जनतेचा विश्वास वाढला आहे. पण सध्या आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. ती भूमिका निभावणार आहोत. सध्या शेतीचे संकट निर्माण झाले आहे. त्यांची दिवाळी अंधारात चालली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम भाजप करेल, असे ते म्हणाले.