नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या तोंडावर आचारसंहिता असताना नेतेमंडळींकडून मुक्ताफळे उधळली जात आहेत. भाजपा सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले विजय गोयल यांनी आम आदमी पक्षाचे चौदा आमदार आपल्या संपर्कात असल्याचे विधान केले आहे. त्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षातील आमदार फोडून किंवा त्यांना आमिष दाखवून विकत घेत सत्ता हस्तगत करणे हीच मोदींची लोकशाही आहे काय?
भाजपातील काही खासदार तसेच स्वतः पंतप्रधान मोदी हे विरोधकांचे संपर्कात आहेत किंवा फोडण्याची भाषा करीत असतील तर त्यांच्याकडे आमदार फोडण्यासाठीचे पैसे येतात कोठून ? आप चे आमदार पैसे देऊन फोडणे हे इतके सोपे काम वाटते काय तुम्हाला ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान मोदी यांनी तृणमूल काँग्रेस चे आमदार संपर्कात असल्याचे बोलले होते त्याधर्तीवर भाजपचे नेते व क्रेंदीय मंत्री विजय गोयल यांनी आपण आम आदमी पक्षाच्या चौदा आमदाराच्या संपर्कात आहोत असे विधान केले आहे. आम आदमी पक्षाच्या कामकाज पद्धतीला हे आमदार वैतागले असून त्यामुळेच पक्ष सोडून जाण्यास तयार आहेत असे विजय गोयल यांनी एका पत्रकार परिषदेत विधान केले होते .
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी अलिकडेच असा आरोप केला होता कि आम आदमी पक्षाच्या आमदाराला प्रत्येकी १० कोटी रुपये ऑफर दिली गेली आहे. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.