वर्धा : बहुजननामा ऑनलाईन – गोवारी समाजाच्या गेल्या ७० वर्षापासूनच्या दशेला जबाबदार कोण, याचा विचार आता समाजबांधवांनी करावा, असे आवाहन गोवारी समाज संघटनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष भास्कर राऊत यांनी केले.
सेलू तालुक्यातील जुवाडी येथे गोवारी समाज संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण व मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना भास्कर राऊत बोलत होते. गोवारी समाजाने १४ ऑगस्ट २०१८ ला जो लढा जिंकला तो कोण्या राजकारण्यांमुळे नव्हेतर समाजाने हा लढा न्यायालयीन मार्गाने जिंकला आहे.
वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन राजकारणाऱ्यांनी समजावर ही वेळ आणली. म्हणून समाजाला शेवटी न्यायालयाचे दार ठोठावे लागले. त्यातून १४ ऑगस्ट हा दिवस आला व नागपूर खंडपीठाने समाजाला न्यायाचे किरण दाखविले. ११४ गोवारी शहिदांच्या रक्ताचे या दिवशी फुलात रुपांतर झाले. समाज प्रबोधनाचे काम करून भास्कर राऊत समाजापर्यंत ज्या गोष्टी पोहोचत नाही त्या पोहोचविण्याचे काम करा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्हा युवा संघटक विपीन सोनवणे, वर्धा जिल्हाध्यक्ष नामदेव राऊत, वर्धा जिल्हा सचिव विलास राऊत, सेलू तालुका अध्यक्ष बजरंग शेंदरे, वर्धा तालुका अध्यक्ष स्वप्नील बांगडे, वर्धा तालुका सचिव राजेश सहारे, खुशी, दुर्गा वाघाडे, भास्कर नेवारे, चैताली कोहळे यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.