बहुजननामा ऑनलाइन : राष्ट्रवादी – काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गळतीवर सगळीकडून टोलेबाजी सुरु आहेत. अनेक नेते पक्षांतर करून भाजप शिवसेनेत प्रवेश करत आहेत, अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीदेखील पुढाकार घेत करत काँग्रेस राष्ट्रवादीवर टोलेबाजी केलीय. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपल्या भाषेत आठवले म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे ‘आऊट गोईंग’ त्यामुळे जोरात आहे आमचं ‘बोईंग’.’ तसेच राष्ट्रवादीत पक्षात राहून सत्ता मिळणार नाही अशी सगळ्यांची भावना आहे. त्यामुळे सगळे पवारांना सोडचिठ्ठी देत आहेत. ज्यामुळे पवार एकाकी पडले आहेत. त्याला आता पवार तरी काय करणार? असा सवालही आठवले यांनी केलाया आहे.
आठवले म्हणाले, कधीकाळी अनेकांना वाटत होते कि, पवारांसोबत राहून सत्ता मिळवू, परंतु आता चित्र पालटले आहे. म्हणून सगळे राष्ट्रवादीला राम राम ठोकत आहेत पवार साहेबांबद्दल मला नेहमी आदर आहे, पण त्यांनी मोदींवर केलेल्या खोड्या आरोपामुळे जनता त्यांच्यापासून दुरावली आहे. मोदींना सर्वानी सहकार्य केलं पाहिजे. मोदींच्या ‘सबका साथ सबका विकास’ या भूमिकेसोबत सर्वांनी उभं राहीलं पाहिजे.
ईव्हीएमविरोधी भूमिका घेणं चुकीचं आहे. तुमच्या सत्तेच्या वेळी देखील ईव्हीएम होतं, तेव्हा आम्ही काही आरोप केले नाहीत . तरी EVM बदलासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोगाने घेतला तर आमची त्याला हरकत नाही. त्याचबरोबर सध्या मोदी लाट आहे, त्यांना आता तुम्हीही साथ द्या असही आव्हान त्यांनी केलं.
आठवले यांनी छगन भुजबळांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर देत म्हणाले कि, ‘ज्यांना भाजप सेने नको आहे, त्यांनी आमच्या कडे यावं. छगन भुजबळांना सेना घेत नसेल तर त्यांनी आमच्या पक्षात यावं. त्यांचे माझे जुने संबंध आहेत . ते बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत, ते पक्षात आले तर पक्षाची ताकदही वाढेल.’
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी