लातूर : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सध्या राज्याच्या विविध ठिकाणी उमेदवारांच्या प्रचार सभा घेत असून लातूर जिल्ह्यातील औसा येथे काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या सरकारवर जोरदार टीका केली. थोरात म्हणाले, ‘भाजप हा खूप गमतीदार पक्ष आहे.
पक्षातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट कापले. हे तिघेही मंत्रिमंडळात मोठे मंत्री होते. त्यांना तिकिट दिलं नाही आणि पीएला मात्र तिकिट देण्यात आलंय. भाजपनं तिकिट देण्यात चूक केली असेल. पण, जनता त्यांना निवडून देण्यात चूक करणार नाही.’ लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार बसवराज पाटील यांच्यासाठी लामजना येथे थोरात यांची जाहीर सभा झाली.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत काश्मीर व 370 चा काय संबंध असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. आज हे लोक महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काश्मीरच्या संदर्भात बोलत आहेत तर उद्या काश्मीरच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे असं सांगणार आहेत का ? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. आणी येत्या 13 तारखेला औसा येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Visit : bahujannama.com